Monday, January 17, 2011

नाट्यसंस्कृतीचा दूत

रंगधर्मी प्रभाकर पणशीकर गेले अनेक दिवस अत्यवस्थ होते. त्याआधी आजारपणाने त्यांच्या हिंडण्याफिरण्यावर मर्यादा आल्या होत्या. रंगभूमीवरून त्यांनी एग्झिट घेऊन तर दहा वर्षांचा काळ लोटला होता. तरीही त्यांचा मृत्यू हा मराठी रंगभूमीशी संबंधित असलेल्या सर्वांना आणि नाट्यरसिकांना हुरहूर लावून गेला. याचे कारण पणशीकर अलीकडच्या काळात कृतिशील राहिले नसले तरी रंगभूमीच्या परिसरात त्यांचा जागता वावर होता आणि नाट्यव्यवसायाच्या अडीअडचणींशी मुकाबला करण्यासाठी ते पुढच्या पिढीतील निर्मात्यांना बळ पुरवीत राहिले होते. गेल्या काही वर्षांत त्यांच्याहून वयाने लहान असलेल्या नाट्यसृष्टीतील कर्तृत्ववान व्यक्ती काळाच्या पडद्याआड गेल्यावर त्यांच्या शोकसभेत बोलण्याची पाळी पणशीकरांवर येई तेव्हा चंदबळ आणून ते बोलतही, परंतु मागच्यांचे मरण आपल्याला पाहायला लागण्याचे दु:ख त्यांच्या विद्ध स्वरातून दरवेळी जाणवे. आता मात्र हे वडीलधारे हळवेपण रंगभूमीला जाणवत राहणार आहे. त्यांच्या जाण्याने मराठी व्यावसायिक रंगभूमीवरील निष्ठावान नाट्यनिर्मात्यांची एक पिढी संपली आहे. साठच्या दशकात मराठी रंगभूमी नवे बळ घेऊन उभी राहत असताना ज्या निर्मात्यांनी तिच्या कलात्मक दर्जाची अखंड काळजी वाहिली आणि दुसऱ्या बाजूने प्रेक्षकांशी सतत स्वत:ला जोडून घेत त्यांच्याशी अभिन्न नाते जोडले त्यांत प्रभाकर पणशीकर हे अग्रभागी होते. मराठी माणसाचे पहिले प्रेम नाटकावर आहे असे म्हटले जाते; परंतु हा जिवंत संबंध प्रस्थापित करण्यासाठी आणि वाढवत नेण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. पणशीकरांना नट म्हणून प्रचंड ग्लॅमर आणि प्रेक्षकांचे प्रेम मिळाले. परंतु स्वत:च्या प्रतिमेच्या प्रेमात न गुरफटता त्यांनी आपली नाटके खेडोपाडी नेली. ज्या गावात जाण्यासाठी रस्ते नीट नसत, जेथे लॉजिंगची साधारणशीही व्यवस्था नसे अशा ठिकाणी त्यांनी आपल्या नाटकांचे प्रदीर्घ दौरे केले आणि छोट्या छोट्या कप्प्यांतही नाट्यप्रेम पेरले. 'नाट्यसंपदा' या आपल्या नाट्यसंस्थेच्या नाटकांचे दौरे आखताना त्यांनी महाराष्ट्रातील निमशहरी आणि ग्रामीण भागांचाही बारकाईने अभ्यास केला होता. त्यामुळे राज्याच्या रस्तेविकास महामंडळाच्या माणसांनाही ठाऊक नसतील असे रस्ते त्यांना तोंडपाठ होते, असे जे म्हटले जाते ते अक्षरश: खरे आहे. 'नाट्यसंपदा'च्या गाजलेल्या व सर्वदूर पोचलेल्या सर्वच नाटकांत त्यांनी कामे केली असेही नाही. वास्तविक त्यांचे पहिले प्रेम हे अभिनयापेक्षा नाट्यव्यवस्थापनावर होते. आपल्या आत्मचरित्रातही त्यांनी 'मी हाडाचा नट नव्हे, मी नाट्यव्यवस्थापक', असे नि:संकोचपणे म्हटले आहे. नाट्यसृष्टी त्यांना पंत नावाने ओळखत असे. पंतांच्या 'तो मी नव्हेच', 'अश्ाूंची झाली फुले', 'इथे ओशाळला मृत्यू', 'मला काही सांगायचंय' या नाटकातल्या भूमिका अत्यंत गाजल्या आणि लोक त्यांना नटश्ाेष्ठ म्हणू लागले तरीही या भूमिका आपणच कराव्यात असे त्यांच्या मनात बिलकुल नव्हते. 'तो मी नव्हेच'मधल्या लखोबा लोखंडेसाठी त्यांनी अनेक नटांची नावे स्वत:हून मो. ग. रांगणेकरांना सुचवली होती. पण रांगणेकरांनी त्यांच्याच गळ्यात ही पंचमुखी भूमिका घालून त्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. तरीही त्यानंतर तालमीत त्यांना ही भूमिका आपण करू नये असे बराच काळ वाटत होते. 'इथे ओशाळला मृत्यू'मधला शहेनशहा औरंगजेब पंतांनीच करावा असा वसंत कानेटकरांनी हट्टच धरल्यामुळे ते नाईलाजाने त्या भूमिकेत उभे राहिले. पण ही भूमिका इतकी गाजली की नटवर्य शरद तळवलकरांनी 'शहेनशहा पणशीकर' एवढाच उल्लेख करून पुण्याहून पाठवलेले पत्र पोस्टमनने बरोबर पंतांच्या घरी आणून दिले. आपल्याला तालमीचा मनस्वी कंटाळा असल्याचे त्यांनीच सांगितलेले आहे. त्यामुळे नाटकाच्या तालमी सुरू असताना ते सतत नाटकाच्या अन्य तयारीसाठी इथेतिथे धावपळ करीत. नाटक हाच ध्यास असल्यामुळे ते उत्तम होण्यासाठी नेपथ्याचा वेगळा विचार करणे, त्यासाठी फिरता रंगमंच तयार करणारा माणूस शोधणे, 'इथे ओशाळला मृत्यू'च्या ड्रेपरीवर अंमळ ज्यादा खर्च करताना पात्रांचे पोषाख अस्सल वाटावेत यासाठी प्रयत्न करणे, जाहिरात वेगळी कशी करता येईल, नामवंत नाटककारांच्या मागे लागून उत्तम संहिता कशी मिळवता येईल, आपण पाहिलेल्या पाश्चात्त्य चित्रपटांच्या वा वाचलेल्या साहित्यातील कल्पना घेऊन वेगळे नाटक करता येईल का, याविषयी लेखकांशी अखंड चर्चा करत राहणे असे जातिवंत नाटक्याने करायचे उद्योग पणशीकर अहनिर्श करत राहिले. अभिनेता ही त्यांची खरी ओळख नव्हेच, ते त्यांच्या समग्र नाटकीय व्यक्तिमत्त्वाचे एक अंग आहे. त्यांची खरी ओळख ही 'नाट्यसंस्कृतीचा दूत' अशीच आहे. रांगणेकर आणि अत्रे यांच्या कंपन्यांमध्ये राहून प्रसंगी नैतिक मुद्यावर त्यांच्याशी फारकत घेऊन त्यांनी आपले अस्तित्व सिद्ध केले. १९६६ ते ७६ हा काळ त्यांच्या बहराचा काळ. तोच व्यावसायिक रंगभूमीच्याही बहराचा काळ होता. तो बहर रंगभूमीला पुन्हा कसा येईल, याची अखंड चिंता करतच हा नाट्यदूत काळाच्या पडद्याआड गेला आहे. 

भावनांवर ताबा ठेवणाराच खरा नट


'' नट म्हणजे भावनांचा कारखाना असतो. ज्याला या भावनांवर ताबा ठेवता येऊ शकतो, तोच खरा नट असतो. नटाला शब्दाचा अर्थ समजला पाहिजे. त्या शब्दांचा अर्थ त्याच्या अंगात भिनवावा लागतो आणि त्यानंतर तो बाहेर काढावा लागतो', असे प्रतिपादन ज्येष्ठ नाट्यअभिनेते प्रभाकर पणशीकर यांनी शनिवारी ठाण्यात केले. ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. 

ज्ञानसाधना महाविद्यालय आयोजित गुरुवर्य स. वि. कुलकणीर् गौरव व्याख्यानमालेत ज्येष्ठ नाटककार अशोक समेळ यांनी प्रभाकर पणशीकर यांची मुलाखत घेत त्यांचा नाट्यप्रवास उलगडला. '१९४५मध्ये मी शाळेच्या संमेलनात एका नाटकात भाग घेतला होता. त्या वेळी घरातून पाठिंबा मिळणार नसल्याने अभ्यासासाठी शाळेत दोन तास थांबावे लागणार असल्याची थाप मारली होती. त्या नाटकातील अभिनयाचे माझे सर्वांनी कौतुक केले होते. म्हणून खोटेपणा आणि नाटकाचा जवळचा संबंध असतो असे मला वाटते', असे पणशीकर यांनी सांगताच उपस्थितांमध्ये खसखस पिकली. 

बदली नट म्हणून काम करताना मी नाटकासाठी जाहिरातदेखील करायचो. भोंगा घेऊन गल्लोगल्ली फिरणे, नाटकाचे फलक रंगवणे, पडदे लावणे अशी सर्व कामे मी करायचो. मी ज्या क्षेत्रात काम करतो त्याची मला पूर्ण माहिती असणे आवश्यक वाटायचे', असे सांगताना पणशीकर यांच्यातला व्यावसायिक दृष्टीकोनही समोर आला. 

तो मी नव्हेच' या नाटकाचा मुहूर्त आचार्य अत्रे यांच्या हस्ते झाला. माझ्यासारख्या नवख्या नटाला ऐवढी मोठी भूमिका जमेल का, अशी शंका अत्रेंना वाटत होती. दिल्ली येथे ८ ऑक्टोबर १९६२ ला पहिला प्रयोग होता. प्रयोग झाल्यानंतर अत्रेंनी स्वत: भेटून माझ्या अभिनयाचे कौतुक केले', असे पणशीकर यांनी सांगितले. सन १९६३ मध्ये वासुदेव कोल्हटकर, मोहन वाघ आणि स्वत: प्रभाकर पणशीकर यांनी मिळून नाट्यसंपदा या संस्थेची निमिर्ती केली. फिरत्या रंगमंंचाची संकल्पना आम्हीच पहिल्यांदा प्रेक्षकांसमोर आणली होती, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. या प्रसंगी ज्ञानसाधना महाविद्यालयाचे अध्यक्ष सतीश प्रधान, प्रदीप ढवळे, प्रवीण दवणे उपस्थित होते. 

....................... 

मेक-अप काढायला वेळ का? 

प्रभाकर पणशीकर यांना मेक-अप काढायला नेहमी वेळ लागायचा. पण बराच वेळ झाला तरी पणशीकर बाहेर येत नव्हते. अखेरीस मी पणशीकर यांच्या खोलीत गेलो. तेव्हा पणशीकर अतिशय हळूवारपणे आणि प्रेमाने त्यांचा मेक-अप काढत होते. यावर आपण तीन तास एका भूमिकेत शिरलेलो असतो. मेक-अपमुळे आपण त्या भूमिकेत शिरू शकतो. मग या मेक-अपला ओरबाडून काढणे मला पटत नाही, असे पणशीकर यांनी सांगितले होते अशी आठवण अशोक समेळ यांनी सांगितली.

नाट्यसंस्कृतीचा दूत

रंगधर्मी प्रभाकर पणशीकर गेले अनेक दिवस अत्यवस्थ होते. त्याआधी आजारपणाने त्यांच्या हिंडण्याफिरण्यावर मर्यादा आल्या होत्या. रंगभूमीवरून त्यांनी एग्झिट घेऊन तर दहा वर्षांचा काळ लोटला होता. तरीही त्यांचा मृत्यू हा मराठी रंगभूमीशी संबंधित असलेल्या सर्वांना आणि नाट्यरसिकांना हुरहूर लावून गेला. याचे कारण पणशीकर अलीकडच्या काळात कृतिशील राहिले नसले तरी रंगभूमीच्या परिसरात त्यांचा जागता वावर होता आणि नाट्यव्यवसायाच्या अडीअडचणींशी मुकाबला करण्यासाठी ते पुढच्या पिढीतील निर्मात्यांना बळ पुरवीत राहिले होते. गेल्या काही वर्षांत त्यांच्याहून वयाने लहान असलेल्या नाट्यसृष्टीतील कर्तृत्ववान व्यक्ती काळाच्या पडद्याआड गेल्यावर त्यांच्या शोकसभेत बोलण्याची पाळी पणशीकरांवर येई तेव्हा चंदबळ आणून ते बोलतही, परंतु मागच्यांचे मरण आपल्याला पाहायला लागण्याचे दु:ख त्यांच्या विद्ध स्वरातून दरवेळी जाणवे. आता मात्र हे वडीलधारे हळवेपण रंगभूमीला जाणवत राहणार आहे. त्यांच्या जाण्याने मराठी व्यावसायिक रंगभूमीवरील निष्ठावान नाट्यनिर्मात्यांची एक पिढी संपली आहे. साठच्या दशकात मराठी रंगभूमी नवे बळ घेऊन उभी राहत असताना ज्या निर्मात्यांनी तिच्या कलात्मक दर्जाची अखंड काळजी वाहिली आणि दुसऱ्या बाजूने प्रेक्षकांशी सतत स्वत:ला जोडून घेत त्यांच्याशी अभिन्न नाते जोडले त्यांत प्रभाकर पणशीकर हे अग्रभागी होते. मराठी माणसाचे पहिले प्रेम नाटकावर आहे असे म्हटले जाते; परंतु हा जिवंत संबंध प्रस्थापित करण्यासाठी आणि वाढवत नेण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. पणशीकरांना नट म्हणून प्रचंड ग्लॅमर आणि प्रेक्षकांचे प्रेम मिळाले. परंतु स्वत:च्या प्रतिमेच्या प्रेमात न गुरफटता त्यांनी आपली नाटके खेडोपाडी नेली. ज्या गावात जाण्यासाठी रस्ते नीट नसत, जेथे लॉजिंगची साधारणशीही व्यवस्था नसे अशा ठिकाणी त्यांनी आपल्या नाटकांचे प्रदीर्घ दौरे केले आणि छोट्या छोट्या कप्प्यांतही नाट्यप्रेम पेरले. 'नाट्यसंपदा' या आपल्या नाट्यसंस्थेच्या नाटकांचे दौरे आखताना त्यांनी महाराष्ट्रातील निमशहरी आणि ग्रामीण भागांचाही बारकाईने अभ्यास केला होता. त्यामुळे राज्याच्या रस्तेविकास महामंडळाच्या माणसांनाही ठाऊक नसतील असे रस्ते त्यांना तोंडपाठ होते, असे जे म्हटले जाते ते अक्षरश: खरे आहे. 'नाट्यसंपदा'च्या गाजलेल्या व सर्वदूर पोचलेल्या सर्वच नाटकांत त्यांनी कामे केली असेही नाही. वास्तविक त्यांचे पहिले प्रेम हे अभिनयापेक्षा नाट्यव्यवस्थापनावर होते. आपल्या आत्मचरित्रातही त्यांनी 'मी हाडाचा नट नव्हे, मी नाट्यव्यवस्थापक', असे नि:संकोचपणे म्हटले आहे. नाट्यसृष्टी त्यांना पंत नावाने ओळखत असे. पंतांच्या 'तो मी नव्हेच', 'अश्ाूंची झाली फुले', 'इथे ओशाळला मृत्यू', 'मला काही सांगायचंय' या नाटकातल्या भूमिका अत्यंत गाजल्या आणि लोक त्यांना नटश्ाेष्ठ म्हणू लागले तरीही या भूमिका आपणच कराव्यात असे त्यांच्या मनात बिलकुल नव्हते. 'तो मी नव्हेच'मधल्या लखोबा लोखंडेसाठी त्यांनी अनेक नटांची नावे स्वत:हून मो. ग. रांगणेकरांना सुचवली होती. पण रांगणेकरांनी त्यांच्याच गळ्यात ही पंचमुखी भूमिका घालून त्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. तरीही त्यानंतर तालमीत त्यांना ही भूमिका आपण करू नये असे बराच काळ वाटत होते. 'इथे ओशाळला मृत्यू'मधला शहेनशहा औरंगजेब पंतांनीच करावा असा वसंत कानेटकरांनी हट्टच धरल्यामुळे ते नाईलाजाने त्या भूमिकेत उभे राहिले. पण ही भूमिका इतकी गाजली की नटवर्य शरद तळवलकरांनी 'शहेनशहा पणशीकर' एवढाच उल्लेख करून पुण्याहून पाठवलेले पत्र पोस्टमनने बरोबर पंतांच्या घरी आणून दिले. आपल्याला तालमीचा मनस्वी कंटाळा असल्याचे त्यांनीच सांगितलेले आहे. त्यामुळे नाटकाच्या तालमी सुरू असताना ते सतत नाटकाच्या अन्य तयारीसाठी इथेतिथे धावपळ करीत. नाटक हाच ध्यास असल्यामुळे ते उत्तम होण्यासाठी नेपथ्याचा वेगळा विचार करणे, त्यासाठी फिरता रंगमंच तयार करणारा माणूस शोधणे, 'इथे ओशाळला मृत्यू'च्या ड्रेपरीवर अंमळ ज्यादा खर्च करताना पात्रांचे पोषाख अस्सल वाटावेत यासाठी प्रयत्न करणे, जाहिरात वेगळी कशी करता येईल, नामवंत नाटककारांच्या मागे लागून उत्तम संहिता कशी मिळवता येईल, आपण पाहिलेल्या पाश्चात्त्य चित्रपटांच्या वा वाचलेल्या साहित्यातील कल्पना घेऊन वेगळे नाटक करता येईल का, याविषयी लेखकांशी अखंड चर्चा करत राहणे असे जातिवंत नाटक्याने करायचे उद्योग पणशीकर अहनिर्श करत राहिले. अभिनेता ही त्यांची खरी ओळख नव्हेच, ते त्यांच्या समग्र नाटकीय व्यक्तिमत्त्वाचे एक अंग आहे. त्यांची खरी ओळख ही 'नाट्यसंस्कृतीचा दूत' अशीच आहे. रांगणेकर आणि अत्रे यांच्या कंपन्यांमध्ये राहून प्रसंगी नैतिक मुद्यावर त्यांच्याशी फारकत घेऊन त्यांनी आपले अस्तित्व सिद्ध केले. १९६६ ते ७६ हा काळ त्यांच्या बहराचा काळ. तोच व्यावसायिक रंगभूमीच्याही बहराचा काळ होता. तो बहर रंगभूमीला पुन्हा कसा येईल, याची अखंड चिंता करतच हा नाट्यदूत काळाच्या पडद्याआड गेला आहे.

पुन्हा नटाचाच जन्म दे


रंगधर्मी प्रभाकर पणशीकर गेले अनेक दिवस अत्यवस्थ होते. त्याआधी आजारपणाने त्यांच्या हिंडण्याफिरण्यावर मर्यादा आल्या होत्या. रंगभूमीवरून त्यांनी एग्झिट घेऊन तर दहा वर्षांचा काळ लोटला होता. तरीही त्यांचा मृत्यू हा मराठी रंगभूमीशी संबंधित असलेल्या सर्वांना आणि नाट्यरसिकांना हुरहूर लावून गेला. याचे कारण पणशीकर अलीकडच्या काळात कृतिशील राहिले नसले तरी रंगभूमीच्या परिसरात त्यांचा जागता वावर होता आणि नाट्यव्यवसायाच्या अडीअडचणींशी मुकाबला करण्यासाठी ते पुढच्या पिढीतील निर्मात्यांना बळ पुरवीत राहिले होते. गेल्या काही वर्षांत त्यांच्याहून वयाने लहान असलेल्या नाट्यसृष्टीतील कर्तृत्ववान व्यक्ती काळाच्या पडद्याआड गेल्यावर त्यांच्या शोकसभेत बोलण्याची पाळी पणशीकरांवर येई तेव्हा चंदबळ आणून ते बोलतही, परंतु मागच्यांचे मरण आपल्याला पाहायला लागण्याचे दु:ख त्यांच्या विद्ध स्वरातून दरवेळी जाणवे. आता मात्र हे वडीलधारे हळवेपण रंगभूमीला जाणवत राहणार आहे. त्यांच्या जाण्याने मराठी व्यावसायिक रंगभूमीवरील निष्ठावान नाट्यनिर्मात्यांची एक पिढी संपली आहे. साठच्या दशकात मराठी रंगभूमी नवे बळ घेऊन उभी राहत असताना ज्या निर्मात्यांनी तिच्या कलात्मक दर्जाची अखंड काळजी वाहिली आणि दुसऱ्या बाजूने प्रेक्षकांशी सतत स्वत:ला जोडून घेत त्यांच्याशी अभिन्न नाते जोडले त्यांत प्रभाकर पणशीकर हे अग्रभागी होते. मराठी माणसाचे पहिले प्रेम नाटकावर आहे असे म्हटले जाते; परंतु हा जिवंत संबंध प्रस्थापित करण्यासाठी आणि वाढवत नेण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. पणशीकरांना नट म्हणून प्रचंड ग्लॅमर आणि प्रेक्षकांचे प्रेम मिळाले. परंतु स्वत:च्या प्रतिमेच्या प्रेमात न गुरफटता त्यांनी आपली नाटके खेडोपाडी नेली. ज्या गावात जाण्यासाठी रस्ते नीट नसत, जेथे लॉजिंगची साधारणशीही व्यवस्था नसे अशा ठिकाणी त्यांनी आपल्या नाटकांचे प्रदीर्घ दौरे केले आणि छोट्या छोट्या कप्प्यांतही नाट्यप्रेम पेरले. 'नाट्यसंपदा' या आपल्या नाट्यसंस्थेच्या नाटकांचे दौरे आखताना त्यांनी महाराष्ट्रातील निमशहरी आणि ग्रामीण भागांचाही बारकाईने अभ्यास केला होता. त्यामुळे राज्याच्या रस्तेविकास महामंडळाच्या माणसांनाही ठाऊक नसतील असे रस्ते त्यांना तोंडपाठ होते, असे जे म्हटले जाते ते अक्षरश: खरे आहे. 'नाट्यसंपदा'च्या गाजलेल्या व सर्वदूर पोचलेल्या सर्वच नाटकांत त्यांनी कामे केली असेही नाही. वास्तविक त्यांचे पहिले प्रेम हे अभिनयापेक्षा नाट्यव्यवस्थापनावर होते. आपल्या आत्मचरित्रातही त्यांनी 'मी हाडाचा नट नव्हे, मी नाट्यव्यवस्थापक', असे नि:संकोचपणे म्हटले आहे. नाट्यसृष्टी त्यांना पंत नावाने ओळखत असे. पंतांच्या 'तो मी नव्हेच', 'अश्ाूंची झाली फुले', 'इथे ओशाळला मृत्यू', 'मला काही सांगायचंय' या नाटकातल्या भूमिका अत्यंत गाजल्या आणि लोक त्यांना नटश्ाेष्ठ म्हणू लागले तरीही या भूमिका आपणच कराव्यात असे त्यांच्या मनात बिलकुल नव्हते. 'तो मी नव्हेच'मधल्या लखोबा लोखंडेसाठी त्यांनी अनेक नटांची नावे स्वत:हून मो. ग. रांगणेकरांना सुचवली होती. पण रांगणेकरांनी त्यांच्याच गळ्यात ही पंचमुखी भूमिका घालून त्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. तरीही त्यानंतर तालमीत त्यांना ही भूमिका आपण करू नये असे बराच काळ वाटत होते. 'इथे ओशाळला मृत्यू'मधला शहेनशहा औरंगजेब पंतांनीच करावा असा वसंत कानेटकरांनी हट्टच धरल्यामुळे ते नाईलाजाने त्या भूमिकेत उभे राहिले. पण ही भूमिका इतकी गाजली की नटवर्य शरद तळवलकरांनी 'शहेनशहा पणशीकर' एवढाच उल्लेख करून पुण्याहून पाठवलेले पत्र पोस्टमनने बरोबर पंतांच्या घरी आणून दिले. आपल्याला तालमीचा मनस्वी कंटाळा असल्याचे त्यांनीच सांगितलेले आहे. त्यामुळे नाटकाच्या तालमी सुरू असताना ते सतत नाटकाच्या अन्य तयारीसाठी इथेतिथे धावपळ करीत. नाटक हाच ध्यास असल्यामुळे ते उत्तम होण्यासाठी नेपथ्याचा वेगळा विचार करणे, त्यासाठी फिरता रंगमंच तयार करणारा माणूस शोधणे, 'इथे ओशाळला मृत्यू'च्या ड्रेपरीवर अंमळ ज्यादा खर्च करताना पात्रांचे पोषाख अस्सल वाटावेत यासाठी प्रयत्न करणे, जाहिरात वेगळी कशी करता येईल, नामवंत नाटककारांच्या मागे लागून उत्तम संहिता कशी मिळवता येईल, आपण पाहिलेल्या पाश्चात्त्य चित्रपटांच्या वा वाचलेल्या साहित्यातील कल्पना घेऊन वेगळे नाटक करता येईल का, याविषयी लेखकांशी अखंड चर्चा करत राहणे असे जातिवंत नाटक्याने करायचे उद्योग पणशीकर अहनिर्श करत राहिले. अभिनेता ही त्यांची खरी ओळख नव्हेच, ते त्यांच्या समग्र नाटकीय व्यक्तिमत्त्वाचे एक अंग आहे. त्यांची खरी ओळख ही 'नाट्यसंस्कृतीचा दूत' अशीच आहे. रांगणेकर आणि अत्रे यांच्या कंपन्यांमध्ये राहून प्रसंगी नैतिक मुद्यावर त्यांच्याशी फारकत घेऊन त्यांनी आपले अस्तित्व सिद्ध केले. १९६६ ते ७६ हा काळ त्यांच्या बहराचा काळ. तोच व्यावसायिक रंगभूमीच्याही बहराचा काळ होता. तो बहर रंगभूमीला पुन्हा कसा येईल, याची अखंड चिंता करतच हा नाट्यदूत काळाच्या पडद्याआड गेला आहे.

To Aata Navhech (He's No More)

To Aata Navhech (He's No More)

Marathi theatre veteran Prabhakar Panshikar succumbed to cardiac arrest and renal failure in Pune on Thursday. He was 79. He immortalized the role of Lakhoba Lokhande, the real life fraudster who married many times over and cheated all his 'wives', in Acharya Atre's 'To Mee Navhech (That is not me). Launched way back in 1962, the play went on to celebrate 2833 shows! The audience was mesmerized by it's dramatic story, Panshikar's superlative six different roles and the revolving stage ('phirta rangmach').

He is also remembered for his role as ruthless Aurangzeb in 'Ithe Oshalala Mrityu'. Among his other memorable plays are 'Ashrunchi Zhali Phule', 'Bhatala Dili Osari', 'Thank You Mr Glad' and 'Jevha Gavtala Bhale Phuttat'.

He lauched his banner Natya Sampada which is now helmed by his son, Vivek and a revived new version of the play 'Vichcha Majhi Poori Kara' is soon to be launched.

Panshikar fondly known as Pant was honoured with Acharya Atre, Bal Gandharva, Keshavrao Date Purskars and felicitated by the Sangeet Natak Akademi as well. He is survived by his wife, two daughters and a son. 


source:

पणशीकरांना दिलीप माजगावकरने पाठवलेले हे पत्र.

दिलीप  माजगावकर, रविवार, १६ जानेवारी २०११ 
राजहंस प्रकाशनतर्फे प्रभाकर पणशीकर यांचे 'तोच मी' हे आत्मचरित्र प्रकाशित करण्यात आले. त्या पुस्तकाची पहिली प्रत पणशीकरांना पाठवताना प्रकाशकाने पाठवलेले हे पत्र.    
पंत,
सप्रेम नमस्कार  
आपल्याइतकी तल्लख स्मरणशक्ती  नसल्यानं वेळ, वार, दिवस, महिना, वर्ष मी अचूक सांगू शकणार नाही; पण बहुधा ते ९०-९१ साल असावं. आपण मला दिलेली 'तो मी नव्हेच'ची जन्मकथा दादरच्या स्टे-वेल हॉटेलमध्ये एकाच बैठकीत मी वाचून संपवली आणि त्याच दिवशी आपल्या आत्मकथेच्या प्रकाशनाचा पहिला पाळणा माझ्या मनात हलला. त्यानंतर आपले नाटकांचे दौरे, काही लागलेले आणि काही हौसेनं अंगावर ओढवून घेतलेले, आपल्या कामांचे व्याप आणि अधूनमधून संपावर जाणारी आपली  प्रकृती.. अशी अडथळ्यांची शर्यत पार करून 'तोच  मी!' पंधरा वर्षांच्या माझ्या पाठलागानंतर आज प्रकाशित होतंय. 
''रंगदेवतेला आणि नाटय़रसिकांना अभिवादन करून 'नाटय़संपदा' सादर करीत आहे..'' प्रयोगाआधी नाटय़संपदेनं सुरू केलेल्या या उद्घोषणेच्या चालीवर मी आणि संपादक सुजाता दोघंही आता म्हणतो, ''सरस्वतीला अभिवादन करून 'राजहंस प्रकाशन' मराठी वाचकांसाठी ग्रंथरूपात सादर करत आहे, प्रभाकर पणशीकरलिखित आत्मकथन 'तोच मी!''
या आत्मकथेची पहिली  प्रत आज आपल्या हाती देतोय. आज २६ नोव्हेंबर. आपल्या लग्नाचा पन्नासावा वाढदिवस. गेली पन्नास वर्षे आपल्या संसारनाटय़ाच्या आणि 'नाटय़संपदे'च्या वाटचालीत आपल्याला साथ देणाऱ्या विजयाकाकूंना ती आपण भेट द्यावी आणि त्यांच्या  हस्ते या पुस्तकाचं  प्रकाशन करावं.
नाटकाचा पहिला प्रयोग,  चित्रपटाचा पहिला शो, पुस्तकाची  पहिली प्रत पाहताना आणि आपल्या बाळाच्या जावळावरून प्रेमानं हात फिरवताना त्याच्या निर्मात्याला होणारा आनंद, लागणारी हुरहुर आणि वाटणारी भीती ही एकाच जातकुळीची असते, असं म्हणतात. आपल्याही मनात काहीशी अशीच अवस्था असेल. वाचक या आत्मकथेचं कसं स्वागत करतात, याची आपल्याइतकीच मलाही उत्सुकता आहे. समोर असणारा वाचक आणि खुर्चीत बसलेला नाटक- चित्रपटाचा प्रेक्षक याच्या मनाचा थांग कोणाला लागलेला आहे? तो लागत नाही म्हणून तर या खेळात गंमत आहे. 
अखेर कोणतीही कला ही स्वान्त:सुखाय असते, असं आपण म्हणतो. एका उच्च आध्यात्मिक पातळीवर ते खरंही  असेल, पण जगातले सर्व सर्जनशील कलावंत रसिकांच्या या प्रेमासाठीच तर आसुसलेले असतात. जगात इतर सर्व गोष्टी जमवून आणता येतात, पण वाचकांचं प्रेम आणि प्रेक्षकांच्या पसंतीची टाळी  जमवून आणता येत नाही, ती आतूनच यावी लागते. ती आपल्याला मिळेल, असं  मनापासून वाटतं.
आपलं आत्मकथन हे ललित लेखन नाही की, केवळ कल्पनाविलास नाही. जे आणि जसं आपण जगलात, तेच आपल्या लेखनातून इथं झिरपलं आहे. यातले अनेक अनुभव वाचताना आजही सटपटायला होतं. आपण तर ते प्रत्यक्ष जगला आहात. जगताना प्रत्येक अनुभव शारीरिक आणि मानसिक पातळीवर त्याची किंमत  मागत असतो. ती किंमत आपण पुरेपूर  मोजलेली आहे. त्यामुळंच हे आत्मकथन स्वप्नांच्या मागं धावताना व्यथा-वेदना भोगलेल्या एका अनुभवसमृद्ध व्यक्तीचं आत्मकथन आहे, हे सतत जाणवत राहतं. वास्तविक, परंपरेनं आखून दिलेल्या समासाबाहेर जाऊन जगू पाहणाऱ्या आणि आयुष्यात काही नवं करू इच्छिणाऱ्या बहुतेक  माणसांचं पूर्वायुष्य हे प्रतिकूल आणि खडतर परिस्थितीशी दोन हात करण्यात खर्ची पडलेलं आपण पाहतो. आपणही त्याला अपवाद नाही. म्हणूनच तर खडतर परिस्थितीतला आपला सुरुवातीचा प्रवास हे आपल्या आत्मचरित्राचं वेगळेपण आणि मोठेपणही नाही. 
मग या आत्मकथनात आपण वेगळे कुठं ठरता? या लेखनाला एका उंचीवर कुठं नेता? तर या साऱ्या प्रवासाकडे, त्यातल्या बऱ्या-वाईट अनुभवांकडे, भेटलेल्या लहान-मोठय़ा माणसांकडे आज वळून बघताना आपण फार प्रगल्भ मनानं बघता. तो प्रसंग, तो माणूस नीट समजून घेता. त्या वेळच्या आपल्या बऱ्या-वाईट वागण्याचं आज आपण समर्थन करीत नाही. कोणाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करत नाही आणि स्वत:लाही न्यायाधीशाच्या खुर्चीत बसवत नाही. आपलीही त्यावेळी चूक झाली असेल, ही शक्यता गृहीत धरता. ती घटना, तो प्रसंग केवळ आपल्या चष्म्यातून न बघता इतरांचे चष्मेही घालून बघता. 
माणसं स्वत:च्या कर्तृत्वानं मोठी होताना आपण बघतो, पण त्यांची आयुष्याविषयीची समज मोठी होतेच, असं नाही. आपण तिथं वेगळे ठरता.
म्हणून तर रांगणेकर- अत्र्यांकडून जे भरभरून आपल्याला मिळालं, त्याविषयी आपण आजही कृतज्ञ राहता. त्यांचे गुण-दोष, त्यांचे राग-लोभ ज्या आत्मीयतेनं रेखाटता, त्यावरून त्यांच्याविषयी आजही आपल्या मनात असलेला आदर आणि प्रेम जागोजागी दिसतं. त्यांच्याशी झालेल्या मतभेदात आपण दोन पावलं मागं यायला हवं होतं, अशी मनातली व्यथा तुम्ही मांडता. 'या दोन मोठय़ा माणसांशी भांडल्यानंतर ज्यांच्याबरोबर आपण भांडावं, अशा उंचीची माणसंच आज उरली नाहीत,' या आपल्या वाक्यातून अत्रे- रांगणेकरांचं मोठेपण आपण किती सहजपणे व्यक्त करता! 
'ज्या रांगणेकरांशी टोकाचे मतभेद  झाले, कंपनी सोडावी लागली, कोर्ट-कचेऱ्या कराव्या लागल्या, कटुता आली, अबोला झाला, तेच रांगणेकर माझ्या आयुष्याचे खरे भाग्यविधाते आहेत, म्हणून हे आत्मकथन मी त्यांनाच अर्पण करतोय,' असं जेव्हा लिहिता, तेव्हा तर पंत तुम्ही आभाळाएवढे मोठे होता. 
''नाटय़संपदे'च्या फुटीच्या वेळी पणशीकर तुम्हीच  नाटय़संपदेचे सर्वेसर्वा आहात, ही जवळच्या मित्रांनी केलेली कानभरणी मी हलक्या कानानं ऐकून खरी मानायला नको होती,'' ही खंत तुम्ही मोकळेपणानं व्यक्त करता. इथंच हे आत्मकथन वेगळ्या उंचीवर जातं.
या पुस्तकात अशा अनेक जागा आहेत की जिथं माणूस सांभाळण्याची आणि तो समजून घेण्याची तुमची धडपड जाणवते. तुम्हीच एके ठिकाणी लिहिलंय की, 'अखेर नाटक म्हणजे तरी काय? तर माणसांनी माणसांशी केलेल्या व्यवहाराचं ते चित्रणच असतं.' म्हणून तर नाटकातली एखाद्या पात्राची भूमिका समजून घेण्याइतकाच- खरं तर त्याहूनही अधिक- जगताना भेटलेला माणूस समजून घेण्याचा तुमचा प्रयत्न, तुमची धडपड हेच तुमच्या आत्मकथेचं एक अंत:सूत्र आहे आणि 'तो मी नव्हेच'मधल्या लखोबा लोखंडेच्या भूमिकेचं सूत्र तुम्ही जसं नाटकभर घट्ट पकडून ठेवलं  होतं, तसंच जगताना या माणसाच्या शोधाचं आणि त्याला समजून घेण्याचं सूत्र तुम्ही घट्ट पकडून ठेवलं आहे, असं पुस्तक वाचताना जाणवत राहतं.
मंगेश पाडगावकरांना जेव्हा दिल्लीच्या साहित्य अकादमीचा सन्मान  मिळाला, त्यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी एक गोष्ट सांगितली होती. वडील आपल्या चार मुलांना ''आयुष्यात तुम्हाला कोण व्हायचंय,'' असं विचारतात. पहिला मुलगा म्हणतो, ''मी इंजिनिअर होणार,'' दुसरा उत्तर देतो, ''मी डॉक्टर होणार,'' तिसरा सांगतो, ''मी सेनाधिकारी होणार.'' चौथा त्याच्या तंद्रीतच असतो. वडील विचारतात, ''अरे, तुला कोण व्हायचंय?'' तो म्हणतो, ''मला.. मला समजून घ्यायचंय.'' वडील विचारतात, ''काय समजून  घ्यायचंय?'' तो म्हणतो, ''मला माणूस समजून  घ्यायचाय. तो दु:खी का होतो? आनंदी का  होतो? तो महत्त्वाकांक्षी का बनतो?  ज्या यशामागं तो छाती फुटेपर्यंत धावतो, त्या यशाचा अर्थ काय? माणूस असा का वागतो? हे मला समजवून घ्यायचंय.'' आणि पुढं पाडगावकर म्हणतात, ''माझी कविता कशासाठी, याचं उत्तर या चौथ्या मुलाच्या उत्तरापेक्षा वेगळं असणार नाही.''
पंत, तुम्ही नाटक कशासाठी केलंत,  याचंही उत्तर त्या चौथ्या मुलाच्या उत्तरापेक्षा वेगळं असणार नाही. अखेर माणसाच्या आयुष्याला एक प्रयोजन असावं लागतं. सगळ्यांनाच ते मिळतं, असं नाही. तुम्ही भाग्यवान, तुम्हाला ते मिळालं. एकदा प्रयोजन मिळालं की माणसं त्यासाठी सारं झोकून देतात. कष्टाची पर्वा आणि पैशाचा हिशोब करीत नाहीत. म्हणून तर 'वीज म्हणाली,' 'पद्मिनी,' 'गवताला भाले,' अशी व्यावहारिक कोष्टकात न बसणारी नाटकं एका झिंगेत तुम्ही करू शकलात. खर्चाचा मेळ बसला नाही, म्हणून आयुष्यभर कर्ज फेडत राहिलात. आपला गाडी-बंगला झाला नाही, बँक बॅलन्स राहिला नाही, या दु:खापेक्षा केलं ते जीव झोकून केलं, परत संधी मिळाली, तर तेच करीन, या आनंदात जगलात.
'पुढचा जन्म मला मिळाला तर तो नटाचाच मिळू देत आणि याच मातीत मिळू दे,' हा आशावाद तुम्ही जागता ठेवला आहे. तो केवळ या प्रयोजनामुळंच. तुम्ही नाटकासाठी जगलात का नाटकानं तुम्हाला जगवलं, हे तुमच्या बाबतीत तरी अद्वैतच राहणार आहे. असो.
पुस्तकाबद्दल बरंच काही लिहिता येईल, पण आपल्या बाळाचं कौतुक लोकांच्या नजरेत येणार नाही इतकंच करावं म्हणून थांबतो.
कळावे, पुन्हा एकदा मन:पूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद!
आपला स्नेहांकित
दिलीप  माजगावकर

एक होता राजा !!!

गेल्या वर्षांत रंगभूमीवरील दोन मोठे निर्माते मोहन तोंडवळकर, मोहन वाघ म्हणता म्हणता गेले. त्याच टीममधले नटसम्राट प्रभाकर पणशीकर. आज रंगभूमीची ५० हून अधिक वर्ष कलाकार आणि निर्माता म्हणून सेवा केली. रंगभूमीवर उभे राहिले की स्टेजवरील बाकीचे कलाकार दिसेनासे व्हायचे. गेल्या २५ वर्षांत मी त्यांना जवळून पाहिले. रंगभूमीसाठी जन्माला आलेले, फक्त रंगभूमीसाठीच जगले. 
महाराष्ट्राच्या नकाशावर असं एकही गाव उरलं नसेल जिथे पणशीकरांनी नाटकाचा प्रयोग केला नाही. कुठल्याही गावाला प्रयोग असू दे किंवा कितीही प्रवास असू दे कधीही ते थकले नाहीत. प्रत्येक गावातली मंडळी त्यांच्यावर एवढं प्रेम करायची, की प्रयोग संपल्यावर ही मंडळी त्यांची बडदास्त ठेवायची. आजुबाजूला जवळपास चाळीसएक प्रेक्षक जे त्यांना वर्षांनुवर्षे ओळखायचे, ते नेहमी गप्पात सामील व्हायचे. कधीही प्रयोगाला उशीरा येणं नाही, उलट प्रयोगानंतर खूप थकवा आलेला असतानाही भेटायला आलेल्या प्रेक्षकांना प्रेमाने भेटत असत. 
निर्माता म्हणून अंदाजे ४० हून अधिक नाटकं केली आणि हजारो प्रयोग केले. स्वत:च्याच नव्हे तर विनय आपटेंच्या नाटकातही काम करत असतानासुद्धा जरा प्रेक्षक कमी दिसले तर मानधन न घेता घरी जायचे. मला निर्माता म्हणून विचाराल तर 'राजा होता तो राजा'.
'तो मी नव्हेच'मधले प्रत्येक रोल करत असताना त्या रोलमधले देखणेपण बघत राहावं असं वाटायचं. कधीही कोणत्याही गावात प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं तर कोणतेही मानधन न घेता परत यायचे. पैसे कमवायचं ठरवलं असतं तर विमानसुद्धा घेऊ शकले असते. पण कधी गाडीसुद्धा घेतली नाही. रस्त्यात नुसते उभे राहिले तर कित्येक गाडय़ा प्रेमाने थांबायच्या. आजारी पडले की मला म्हणायचे स्टेज आणि प्रेक्षक दिसले की मी बरा होतो. अशा राजाच्या कुटुंबात स्वत:चा आणि त्यांच्या मुलांच्या लग्नाचा वाढदिवस कधी आला आणि कधी गेला ते कुणाला कधी कळलंच नाही.
एवढय़ा वेगवेगळ्या नाटकात वेगवेगळ्या भूमिका केल्यावर जरासुद्धा मोठेपणा आणि कुठलाही गर्व दिसला नाही. मी त्यांच्यावर मनापासून खूप प्रेम केलं. पन्नासहून अधिक वर्ष कलाकार म्हणून रंगभूमीवर टिकणं म्हणजे मस्करी नाही. माझ्या वडिलांसारखेचं ते होते. पण बघायला गेलं तर माझे जवळचे दोस्त, जवळचे मित्र. रंगभूमीवर स्वत: निर्माता आणि नट असलेले यशस्वी म्हणजे बाळ कोल्हटकर, विद्याधर गोखले, मच्छिंद्र कांबळी, बाबूराव गोखले, भालचंद्र पेंढारकर आणि प्रभाकर पणशीकर. 
जसे आचार्य अत्रेंना प्रेमाने लोक आचार्य म्हणायचे, पु. ल. देशपांडेना 'भाई' म्हणायचे तसेच रंगभूमीवरील मंडळी त्यांना प्रेमाने 'पंत' म्हणायची. याच प्रेमामुळे मला त्यांना माझ्या ग्रुपमधून अमेरिकेला न्यायचे होते. ते मी २००४ साली पूर्ण केले. त्यांच्या अभिनयाने अमेरिकेतले थिएटरदेखील कोसळले. मी त्यांच्या मागे लागून त्यांना शिकागोला फिरायला नेले. तेव्हासुद्धा त्यांनी मला विमानाचे तिकीट रद्द करून, माझ्या तिकडच्या नाटकाच्या बसमधून आले. अशा राजाबरोबर मला सेवकासारखं राहायला मिळालं. हे माझं भाग्य आणि हाच माझा आनंद. 
मी त्यांना बघायला हॉस्पिटलमध्ये गेलो, ज्या पंतांनी रंगभूमीला अभिनयाचा श्वास घ्यायला शिकवला, त्याच नटसम्राटाला श्वास घ्यायचा त्रास होत होता. एवढा मोठा अभिनयाचा औरंगजेब अशा अवस्थेत बघवत नव्हता. जसे ताजमहालावर उन्हाचे किरण पडले की जसा तो चमकतो तसे ते नाटकाच्या स्टेजवर आल्यावर चमकायचे. सतत बोलका चेहरा, स्मितहास्य, मिश्किल स्वभाव असे म्हणायला हरकत नाही. 
प्रत्येक कलाकाराने त्यांच्या स्वभावातले आणि त्यांच्या तत्त्वातले पन्नास टक्के गुण घेतले तर रंगभूमीला सोन्याचे दिवस येतील. पंत कधी राजासारखे वागले नाहीत, पण रंगभूमीवरचा राजा होता तो राजा.